दोन शब्द…..
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. या मंगलमयी दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते पंकज धर्मदास कांबळे यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “ज्यांनी कोटी कोटी काळजाला सन्मानाची भाषा शिकवली आणि ज्यांनी गुलामगिरीच्या शृंखला तोडून आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा या जागतिक कीर्तीच्या विद्वानाचे विचार घराघरात पोहोचवणे हीच काळाची गरज आहे.”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांवर चालण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राजूर येथील दीक्षाभूमी बुद्ध विहार तसेच युवा भीम शक्तीच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा हा वारसा असाच पुढे नेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
🎉शुभेच्छुक: पंकज धर्मदास कांबळे🎉
जिल्हा संघटक, भीम आर्मी.उपाध्यक्ष, दीक्षाभूमी बुद्ध विहार, राजूर. रजिस्टर A-1316Founder Membar युवा भीम शक्ती,राजुर

