•मनसे नेते राजु उंबरकर यांचा पत्रकार परिषदेतून घणाघाती टीका.
अजय कंडेवार,वणी :- शहराला तब्बल १५ दिवस पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. तसेच दुषित पाणीपुरवठ्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.फिल्टर प्लांट मृतावस्थेत असून, केवळ ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा होत आहे.विद्यमान आमदार यांना जर स्वच्छ पाणीपुरवठा करता येत नसेल तर आमदार म्हणून सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि म्हणूनच आमदाराने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून आमदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच नवीन फिल्टर प्लांट व पाइपलाइन करिता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी निधी मंजूर करून आणावा असे आव्हान देत दि.15 जुन 2023 ला सायं.ठीक 5 वाजता शिवमुद्रा मनसे जनसंपर्क कार्यालय नांदेपेरा रोड वणी येथे, राजू उंबरकर(मनसे, नेता) यांचा प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.Stop playing with health of business tax and resign.. MNS leader Raju Umbarkar’s harsh criticism from the press conference.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात वणी शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.गेले पंधरा दिवस शहराला पिण्यायोग्य पाणीच मिळाले नाही. सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता आणि भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला हाल सोसावे लागत आहेत. १५ दिवस जर सर्वसामान्य नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नसेल तर नगरपालिकेचा उपयोग काय ? असा प्रश्न पडला आहे. सिंधी कॉलनी ,सरकारी रुग्णालय, शेतकरी मंदिर परिसर व दामले फैल परीसर या ठिकाणचे (मलमुत्र युक्त) पाणी थेट नदीत सोडण्यात येत असून वणी शहरातील सामान्य नागरिकांना हा मलमूत्र युक्त पाणीपुरवठा होत असून वणीकर जनतेच्या आरोग्याशी खेळ सत्ताधारी करत आहे आणि यामुळे वणीकर जनतेचे आरोग्य धोक्यात येत असल्याची खळबळजनक माहिती समोर आलेली आहे.“ सत्तेच्या गुंगीत मग्ण होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांची लोकप्रतिनिधींना जाण राहिलेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधी आमदारांनी पत्रकाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी जळण्याचे सांगितले. हे सांगत असुन पंधरा दिवस मोटारी जळल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहिला पण तुम्ही त्यावर काय उपाययोजना केल्या ? याचे उत्तर देखील विद्यमान आमदारांनी दिलेले नाही.कोणतेही पद नसताना वणी विधानसभा क्षेत्रावर कोणतेही संकट आल्यास सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून जाते. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिताफीने पुढे येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शहरभरात मोफत पाणीपुरवठा केला जातो. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही विद्यमान आमदारांना जर स्वच्छ पाणीपुरवठा करता येत नसेल तर आमदार म्हणून सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि म्हणूनच आमदाराने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून आमदारकीचा राजीनामा द्यावा. असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.”
शहराला रोज जवळपास लाखो लिटर पाण्याची आवश्यकता भासते परंतु शहरात वॉटर फिल्टर प्लांट हा मृता अवस्थेत आहे आणि नदीमध्ये येणारे सांडपाणी हे जलशुद्धीकरण केंद्राच्या केवळ ३०० मीटर अतिशय गंभीर बाब आहे. तसेच शहरातील पाईपलाईन सुद्धा सडलेली असून आमदार वॉटर फिल्टर प्लांट व शहरातील पाईपलाईन साठी निधी मंजूर करून आणावा व वणीकर जनतेला शुद्ध पाण्याची व्यवस्था करून द्यावी असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण शहरात जनजागृती करून भव्य मोर्चाचा एल्गार पुकारेल याची सुद्धा नोंद स्थानिक आमदाराने घ्यावी.त्याचप्रमाणे या संपूर्ण शहरातील मलमूत्र युक्त पाणीपुरवठा होण्यामागे जो कोणता प्रशासकीय अधिकारी जबाबदार असेल त्या अधिकाऱ्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करावे. अशी मागणीही करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित मनसे नेता राजू उंबरकर, तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शहर प्रमुख शिवराज पेचे व सर्व पत्रकार उपस्थित होते.