•अन्यथा … मनसे खळखट्याक आंदोलन करेल.
अजय कंडेवार ,वणी:- महावितरण कंपनीचा कारभार अतिशय भोंगळ असून त्यांनी वेळीच त्यांचा भोंगळ कारभार सुरळीत करावें तसेच महावितरण कंपनीने टाकलेल्या विदयुत तारांचा अपघाताने लाठी गावातील 8 वर्षीय पियूष माहूरे या मुलाचा पायाची बोटे उपचारादरम्यान कापली गेल्याने पियूशचा भविष्यातील संपूर्ण नुकसान भरपाई MSEB मार्फत त्वरित देण्यात यावी, याबाबत रविवार दि. 4 मे.2023 ला सकाळी ठीक 11 वाजता शिवमुद्रा मनसे जनसंपर्क कार्यालय नांदेपेरा रोड वणी येथे, राजू उंबरकर(मनसे, नेता) यांचा प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.”This…..” The child’s toes were cut off.. Otherwise … MNS will protest loudly.
तालुक्यात महावितरण कंपनीने टाकलेल्या केबल्समुळे ८ वर्षीय मुलाचा अपघात लाठी या गावात घडला. महावितरण कंपनीचे विद्युत तार शेतातून गेलेले आहे. हा तार कित्येक ठिकाणी लोंबकळत असतात तर अनेकदा जमिनीला सुद्धा जिवंत वीज तारांचा स्पर्श झालेले आहे असल्या प्रकारामुळे विद्युत तारांचा स्पर्श होऊन अनेकदा गुराढोरांचा नाहक जीव घेतले आहे .यातच लाठी गावातील 8 वर्षीय मुलगा पियूष माहूरे याचा महावितरण कंपनीने टाकलेल्या विदयुत तारांमुळे अपघात दि. 02 मे. ला तो शेतात मित्रांसोबत खेळत असताना महावितरणाच्या वीज वाहिण्या खाली पडलेल्या अवस्थेत असल्याने तारेचा जबर स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्यामुळे बालकाचे हात पाय जळाले व बालकाची प्रकृती अतिशय गंभीर झाली. सद्याचा परिस्थितीत तो बालक लातूरला डॉ. लहाने याचा इस्पितळात उपचार घेत असताना त्याच्या पायाची बोटे कापण्यात आली आहे.पियुशच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे पुढील उपचार घेण्याकरिता त्यांच्याकडे पैसे नसल्याने पियुष माहुरे यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने उचलली आहे.
अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या परंतु MSEB मार्फत कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आलेल्या नव्हत्या म्हणूनच अपघात घडलेला आहे. अपघात घडल्यानंतरही MSEB मार्फत या बालकाला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बालकास दत्तक घेतलेले आहे व त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचललेला आहे.या विभागामध्ये महावितरण कंपनीचा कारभार अतिशय भोंगळ सुरू असून त्यांनी वेळीच कारभार सुरळीत करायला हवा व पियूषची भविष्यातील संपूर्ण नुकसान भरपाई MSEB मार्फत त्वरित देण्यात यावी,
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन पुकारेल, या प्रसंगी तुरुंगात सुद्धा जाण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी आहे असा स्पष्ट इशारा या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे .
यावेळी उपस्थित मनसे नेता राजू उंबरकर, मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकर, मनसे शहर प्रमुख शिवराज पेचे व पत्रकार बंधू उपस्थित होते.