•त्वरित जलशुद्धीकरण करण्याची मागणी
अजय कंडेवार, वणी:- त्वरीत जलशुद्धीकरनाचे नूतनीकरण करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबतचे निवेदनातून c.o ला मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी धारेवर धरले.
वणी शहर हे महाराष्ट्रात एक वैभवशाली शहर म्हणून ओळखल्या जाते त्याचप्रमाने शहराच्या आजूबाजूस मोठमोठे व्यवसाय आहेत. त्यामुळे शहरांमध्ये व्यतिरिक्त इतरही लोक वास्तव्यास आहे . विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखल्या जाते. न. प. तील मतदार संख्या 40 ते 45 हजार इतकी आहे. शहरात विविध व्यवसाय त्यातच न. प. चे व्यवसायिक गाळे व शहरात असलेली घरे यामधून न. प. ला कोट्यावधीचा महसूल जमा होतो. याव्यतिरिक्त शासनाकडून प्राप्त निधी सुद्धा न. प. ला मिळतो असे असताना सुद्धा महाराष्ट्रातील वैभवशाली ओळख असलेल्या शहरात न. प प्रशासन जनतेच्या जीवावर उठलेले दिसून येते. त्यातील प्रामुख्याने हा शुद्ध पिण्याच्या पाण्याची बोंब गेल्या अनेक वर्षापासून शहरवासीयांना भेडसावीत आहे. यामध्ये शहरातील जलशुद्धी केंद्र हे गेल्या अनेक वर्षापासून मृत अवस्थेत असल्याचे दिसून येते व यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत चालली आहे. अशुद्ध पाण्यापासून होणाऱ्या आजारामुळे सर्व जनता त्रस्त होत आहे. हे सर्व आपणास माहिती असून सुद्धा या नगरपरिषदेचे आपण मुख्याधिकारी असून दुर्लक्ष करीत आहात ही, अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपणास आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. आपणास नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कुठलाही अधिकार नाही. शासनाकडे योग्य तो पुरवठा करून या शहरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्वरित जलशुद्धीकरण केंद्र उभारावे व जनतेला सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. असे न झाल्यास जनतेच्या रोषाला समोर जाण्याची तयारी ठेवावी.यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे, गीतेश वैद्य उपाध्यक्ष, अर्चना बोदाडकर महिला जिल्हा अध्यक्षा, वैशाली तायडे, लकी सोमकुंवर, शंकर पिंपळकर, श्रीपाद धोटे, लोकेश लडके, रुचिर वैद्य, अनिकेत पिदूरकर, शुभम आवारी, सूरज भिवलकर, मनोज पुराणकर, उपस्थित होते.