Thursday, May 15, 2025
Homeअपघातजिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती.....

जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती…..

•अपघात रोखण्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

•वाढता अपघात आलेख बघता.. वणीत हेल्मेटची किती सक्ती होईल हे बघणे गरजेचे.

अजय कंडेवार,वणी :- राज्यातील काही जिल्ह्यात हेल्मेट सक्ती आहे परंतु या हेल्मेट सक्तीचे काही जिल्ह्यात कडक आदेश आहेत तर काही ठिकाणी नाहीत. दरम्यान आता हेल्मेट सक्तीच्या यादीत अजून एक जिल्ह्याचा समावेश झाला आहे. आजपासून पुन्हा दूचाकीसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहन चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई आणि दंडही आकारला जाण्यात येणार आहे.

जिल्ह्यात २०२२ या वर्षात ६६२ वाहनांचे अपघात घडले असून, मृत्यूमुख ४२६ तर ५८६ गंभीररित्या जखमी झाले. जखमीपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर तसेच त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटुंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात होतो, त्यांची हानी होते. ती कधीच भरुन निघणारी नसते. वाहन अपघातात मृत्यू होणाºयांची संख्या लक्षात घेता, ७० टक्के अपघातामध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू डोक्यावर हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे दिसून येते. विशेष करुन दुचाकीस्वारास अथवा त्याचे मागील सिटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे.

अपघातांच्या संख्येत तसेच त्यामध्ये मृत्यू व जखमी व्यक्तींच्या संख्येत मासिक ३० टक्के कमी करण्याचे दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाºया वाहन चालकांविरुद्घ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. १ मार्चपासून जिल्ह्यातील शहर व १६ तालुक्यातील मुख्य व इतर रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे.

वणी उपविभागात वाढता अपघात आलेख बघता वणी वाहतूक शाखा काय, किती आणि कितीदिवस कारवाई करतात याकडे जनतेने लक्ष देणे गरजेचे आहे.”

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments