Saturday, April 26, 2025
Homeझरीअडेगाव येथून 'बालविवाह मुक्त भारत अभियानाची' सुरूवात

अडेगाव येथून ‘बालविवाह मुक्त भारत अभियानाची’ सुरूवात

देव येवले,झरी :- नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी तीन वर्षांच्या बालविवाह मुक्त भारत मोहिमेची सुरुवात केली. ज्याच्या उद्देशाने लोकांना बालविवाहाबद्दल जागरूक करणे आणि त्यांची विचारसरणी आणि वर्तन बदलणे आणि मुलांची सुरक्षा सुनिश्चित करणे. रविवारी सुरू झालेल्या या राष्ट्रीय अभियानांतर्गत दिन बहुुद्देशिय संस्था दिग्रस व उमेद यांच्या मार्फत तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायत येथे जनजागृती करण्यात आली. यामध्ये कॅण्डल पेटवून बालविवाह बंद करण्याची शपथ घेण्यात आली.

याबाबत दिन बहुुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख म्हणाले की, बालविवाह व बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी अनेक कायदे असूनही आजही बालविवाहाची प्रक्रिया सुरू आहे. या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात बालविवाह हा सर्वात मोठा अडथळा आहे. यासोबतच कैलाश सत्यार्थी यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान सुरू केले आहे. सामाजिक वर्तन आणि विचारसरणीत बदल घडवून बालविवाहाच्या गुन्ह्यांचे उच्चाटन करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.


या मोहिमेअंतर्गत तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत, ज्यामध्ये पहिले म्हणजे कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे, दुसरे म्हणजे मुले आणि महिलांचा सहभाग वाढवणे, त्यांना सक्षम करणे आणि १८ वर्षापर्यंत मोफत शिक्षण देणे आणि तिसरे उद्दिष्ट. लैंगिक शोषण रोखणे. मुलांना संरक्षण देणे. त्याची आजपासून देशात सुरुवात झाली आहे.

मोहिमेच्या प्रारंभी, अडेगाव येथून सुरवात करण्यात आली. यावेळी सरपंचा सिमा लालसरे, पो. पा. अशोक उरकुडे, प्रतिभा खोबरे, मनीषा वासाडे, सपना काटकर, संगीता झाडे, आशावर्कर ममता माहुरे, उमेद चे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments