•उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निखिल धुळधर यांचे नाव जाहीर..
•वणीची पहिलीच जोईनिंग अन् प्रथमच उत्कृष्ट पुरस्कार.
अजय कंडेवार,वणी :- तालुक्याचे तहसीलदार निखिल धुळधर यांची महसूल अमरावती विभागात सर्वात उत्कृष्ट तहसिलदार म्हणून निवड झाली आहे . विशेषतः पाच जिल्ह्यातून एकमेव तहसिलदार म्हणून वणीचा तहसिलदार यांनाच कर्तव्यदक्ष म्हणून मान मिळाला. यात वणीचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा अस म्हणायलाही हरकत नाही. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन असतो आणि या महसूल दिनानिमित्त महसूल विभागात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.त्याच पार्श्वभूमीवर वणी तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या तहसीलदार निखिल धुळधर यांची सर्वोत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड झाली आहे.Out of five districts only Vani’s Shirpechat ManachaTura.Nikhil Dhuldhar’s name announced as the best Tehsildar.Wani’s first joining and first best award.
काही अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात, त्यामध्ये फक्त करिअरचाच मुख्य उद्देश असतो असे नाही. त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करता येते, त्यांचे प्रश्न सोडवता येतात, खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि त्यातून लोकसेवा करता येऊ शकते. हे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत येतात. जनतेशी एकरूप होतात. निखिल धुळधर हे असेच एक अधिकारी. तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या धुळधर यांच्याकडे चित्र बदलवण्याची ताकद आहे. अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ असे तहसीलदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे पनवेलसारख्या सर्वात मोठ्या महसुली तालुक्याचे तहसीलदार म्हणून ते काम करीत आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये तहसिलदार धुळधर यांनी आपल्या कार्यतत्परतेने त्याची चुणूक दाखवून दिली आहे. कोरोना काळामध्ये ते वणीचे तहसीलदार झाले. वणी क्षेत्रांमध्ये ज्याप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती, त्याप्रमाणे ग्रामीण अनेक मध्येही कोविडचा प्रादुर्भाव झाला होता. कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः जनजागृती केली. सार्वजनिक ठिकाण गर्दी होणार नाही, सामाजिक अंतर पाळले जावे या सह इतर गोष्टींची त्यांनी खबरदारी घेतली. तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून वणी नगरपालिकेलाही अती सुंदररित्या सांभाळन्याचे कार्य देखील यांनी केले.
कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही तालुक्याचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. यंदाही व मागील वर्षी देखील पूरग्रस्त पीडितांना वेळोवेळी तत्पर राहणे व काळजीपूर्वक जनतेला सोय उपलब्ध करून देण्याचे कार्य रुजू झाल्यापासून दिसून आले.अखेर त्यांचा कामाची पावती त्यांना मिळालीच.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक आणि स्वागत होत आहे…