•मानवी जीवन धोक्यात,२५ लाख रुपये शासनाने मदत द्यावी.
अजय कंडेवार,वणी :– तालुक्यातील वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणीचे निवेदन काल दिनांक 12 नोव्हेंबरला माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी सुधीर मुनगंटीवार (मंत्री वने मत्स्य व्यवसाय, सांस्कृतिक कार्य, मुंबई) यांना साकडे घातले आहे.
वणी तालुक्यामध्ये प्रथम २०१७ मध्ये उकणी खान परिसरात १ बाघ आला व अनेक जनावरे मारली त्याचा संचार बर्धा नदी लगत असणाऱ्या खान परिसरातील पिंपळगांव, बोरगांव, जुनाड, कोलार पिंपरी, गोवारी, मुंगोली, कलर, निलजई, बेलोरा परिसर भागामध्ये फिरत असतांना मानवावर हल्ला झाला नाही, परंतु आता ४ वर्षात या परिसरामध्ये ६ ते ७ बाघ फिरत आहे. खानवाधीत क्षेत्रातील गावे वेकोली ने १० ते २०% जमिन अधिग्रहन न केल्याने. पिंपळगांव, जुनाड, बोरगाव, उकणी, कोलार पिंपरी, गोवारी, मुंगोली गावातील नागरीकांना पुनर्वसन अभावी वेकोली निर्मीत जंगल सदृष्य भागात नाइलाजाने रहावे लागते. सोबतच माथोली, जुगाद, कोलगांव साखरा, चारगांव, वारगांव कवडशी, शेवाळा जंगल परिसर शेतकऱ्यांना शेतावर जाणे, गावातुन बाहेर जाणे वाघाच्या भितीमुळे कठीण झालेले आहे. तसेच खाणीमध्ये कामावर जाणारे ३००० हजाराच्या वर कामगार यांनाही भितीच्या व जाणारे विद्यार्थी व दैनदिन प्रवासी यांना सतत भितीच्या वातावरणात प्रवास करावा लागतो. बारवरणा प्रवास करावा लागतो.
सोबतच शाळेत यातच दिनांक १०/११/२०२२ रोजी अभय मोहन देऊळकर मु. रांगणा ता. वणी वय २५ वर्षे शेतकरी सायं. ५-३० वाजता शेतात वाघाने हल्ला करून ठार मारले, या दुर्दवी घटने पासुन तालुक्यातील वाघ बाधीत क्षेत्रात मितीचे वातावरण पसरले असुन शेतावर मजुर येण्यास भितीमुळे कठिण झाले आहे. परिणामी शेतीव्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता. नागरी जिवण संरक्षणासाठी उपाय योजनाची गरज आहे. वणी तालुका परिसर वेकोली खाणीने व्यापला असुन वेकोली मधील ओव्हर बर्डन (ओ.बी.) ढिगारे, खुली जागा, रस्ते यावर मोठा प्रमाणात फोसोपिस वनस्पती झाडे वाढले असुन त्याने जंगल सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे. मागील ४ वर्षात वाघाच्या संख्येत वाढ मुक्त संचाराने सहज दर्शन होते. शेतकरी, शेतमजुर, कामगार भित्तीचे, दहशतीचे वातावरण नागरीकांच्या जिवितास धोका होणार नाही. अशी व्यवस्था निर्माण करावी.
१) प्राधान्याने वेकोली खुली जागा, ओव्हर बर्डन, शेत व शहराकडे गावातुन जाणाऱ्या रस्त्यालगत फोतोमिस झुंडप पुर्णपणे साफ करून जागा मोकडी करावी.
२) वेकोलीने खानबाधीत गाव रस्त्यावर मोठे लाईट लावून रात्रीच्या वेळेस प्रकाशाची व्यवस्था करावी.
३) प्रकल्पग्रस्त गावातील उर्वरीत १० ते २०% जमीन वेकोलीने अधिग्रहन करून गावाचे पुनर्वसन करणे.
४) वन विभागाने जंगलालगत शेतकऱ्यांना तार कंपाऊंड उपलब्ध करून देणे.(५) वाघवाधीत क्षेत्रातील गावात बाघ संरक्षण मजुर नेमून वन विभाग व नागरीकांना सतर्क करणे.६) वणी उपविभागत वन विभागाने पेट्रोलींग गाडी संख्या वाढवून दिवस रात्र गस्त घालणे. (७) वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या परिवारातील सदस्याला वन विभागात नौकरी व २५ लाख रुपये शासनाने मदत द्यावी.वरील प्रमाणे समस्या निवारण करावे.
यासाठी निवेदन सावन खाडे, दिपक मुत्ते, सरपंच पिपरगाव ,विजय पिदुरकर. माजी जि.प.सदस्य, महेश देठे, प्रदिप जेऊरकर,अतुल बोडे, निखिल उपासे, विश्र्वास बोरपे , निलेश पिंपळकर,गणेश जेनेकार यांनी दिले.