•काँग्रेसला केला सलाम.
• शहरात ‘ राकाँ’ला मिळाली संजीवनी.
अजय कंडेवार,वणी:- राज्यात महाविकास आघाडीत सरकारमध्ये एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षांमध्येच अशा स्वरुपात धडाकेबाज कार्यकर्त्यांचं पक्षांतर होत असल्यामुळे आता खालचा स्तरावरही या विषयी नाराजीचे पडसाद पुन्हा एकदा उमटू लागलें आहे. आता या प्रकरणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढल्याची चिन्ह आहेत.आज दि. 17 सप्टें. रविवार रोजी नागपुर येथे माजी गृहमंत्री अनील देशमुख यांच्या नेतृत्वात वणीतील ज्येष्ठ,धडाकेबाज, कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते समजले जाणारे राष्ट्रीय मजदुर काँग्रेसचे सचिव या पदावर कार्यरत होतें. या पदासहित आबिद हुसैन यांनी काँग्रेसला ‘सलाम ” करीत राष्ट्रवादीत जंगी प्रवेश केला.त्याचासोबत आणखी काहींनी प्रवेश घेतल्याची माहिती आहे.

या प्रवेशाने काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत चांगलाच धक्का बसेल अशीही आशा व्यक्त केल्या जात आहे. आता हा नेमका धक्का कुुणाला ? येणारा काळ सांगेल. अश्या धडाकेबाज कट्टर काँग्रेसचा कार्यकर्त्याने असा निर्णय का घेतला असावा चिंतणाची बाबच..
है ना हमारे महाविकास आघाडी मे…. अरे भाई काँग्रेस और राष्ट्रवादी अलग पक्ष है…… समझो जरा


