Ajay Kandewar वणी :- तालुक्यातील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झालेला नाही. त्यामुळे रेती उत्खननातील कमी कालावधीत अमाप पैसा मिळत असल्याने अनेक रेती तस्कर संपूर्ण वणी तालुक्यातील या व्यवसायात उतरले आहेत.तालुक्यातील सर्वच रेतीघाट बंद आहेत. तरीही बांधकामावर रेती दररोज येत आहे.”त्या एका खादाडा” मूळे रेतीमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रेतीमाफियांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी गप्प संबंध ठेवून जणु काहीं खुलेआम आव्हान दिले असून, हिंमत असेल, तर आमचे ट्रक, ट्रॅक्टर पकडून दाखवा, असे ठणकावले असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली.वणी महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची ओरड तालुकावासीयांनी केली आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जात असून रात्रंदिवस मोठ्या गाड्यांनी रेतीची वाहतूक केली जात आहेत आता तर दिवसा ढवळ्या ही शहरात रेती पडत आहे. तरी महसूल विभाग कोमात दिसत आहे. अनेक कारवाया महसूल विभाग असलें तरी सुध्दा वणी तालुक्यातून रेती तस्करी रोखन्यात वणी महसूल प्रशासनाला यश आले नाही. वणी तालुका नद्यांनी वेढलेला आहे. नागरिक पूर्णतः नैसर्गिक शेतीवर अवलंबून असून उद्योग विरहित तालुका म्हणून ओळखला जातो. अशात रेतीमाफीयांची वणी हब बनले आहे.
“तालुक्यातील रेती घाट बंद आहे. रेती तस्करांनी अनेक रेती जागोजागी स्टॉक करून बेभाव विक्री करत आहे. अवैध रेतीसाठे जप्त करून घरकुल धारकांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी – अजिंक्य शेंडे (यवतमाळ उपजिल्हा प्रमुख)”
•तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी……
तालुक्यातील अहेरी बोरगाव, शिंदोला, बेलोरा परिसरातुन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैधरित्या उपसा होतो व त्याची वाहतूक होते. यावर अध्ये मध्ये पोलीस प्रशासन कारवाई करते. मात्र महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रेती तस्करीमुळे पर्यावरणाचे तर मोठे नुकसान होतच आहे. आणि काहीं खादाडामूळे शासकीय तिजोरीला करोडोचा चुना लागत आहे.याशिवाय मोठ्या प्रमाणात प्रशासनाचेही आर्थिक नुकसान होत आहे. रेती तस्करीवर थातूरमातूर कारवाई करून वेळ मारुन नेण्याचे काम सध्या तरी प्रशासन करीत आहे आता तरी त्या खादाडवृती बंद करून खादाडगीरी वर अंकुश बसावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.