Ajay Kandewar,Wani:- वणी महसूल प्रशासनाला रेती तस्करीचा विषय काही नवीन नाही. मात्र महसूल यंत्रणेतील काहीं भ्रष्टाचारी शुक्राचार्य तस्करांच्या दावणीला बांधले गेल्याने तालुक्यात रेती तस्करी फोफावली, सर्वाधिक रेती तस्कर वर्धानदी पात्र व पैनगंगा परिसरात वाढली आहे. या तस्करांना महसूल प्रशासनाचे “जयंता “लाभल्याने निगरगट्ट झालेले रेती तस्कर ‘गब्बर’ झाले एव्हढेच नाही तर “कुणाल “सहीत “तो खादाड “ ही मालामाल होत आहे.
अधिकारी-कर्मचारी संबंध बांधील असल्याने कोणीही वाकडे करू शकत नाही या तोऱ्यात रेतीतस्कर वावरत आहे. रात्री तर सोडाच मात्र दिवसाही वणी शहर व बाजूंचा परिसरात रेतीतस्करी वाढल्याने ग्रामस्थांनी महसूल यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. महसूल प्रशासनातून ‘ जयंत’ लाभत असल्याने वर्धा नदीतील तस्करी जणु काही ‘ कु..णाल’ मूळे खादाड ही मालामाल झाला आहे.
खनिज संपत्तीवर डोळा ठेवणारा ‘ जयंत‘ मस्त त्या “उमेश लाभल्यामुळे महिण्याकाठी लाखोची उलाढाल “तो “करीत आहे आणि त्यात कुणाल “मस्त माल आने दो…रेती जाने दो…” म्हणत “त्या एका खादाडाच ” पोट भरून देत असल्याची चर्चा सध्या जोमात आहे. “या खादाडांन “ काही रेती तस्करांनी रेती चोरीच्या धंद्यात चांगलाच जम बसविला आहे. त्यातूनच अधिकाऱ्यांची कार्यवाही “सीर्फ गाडी लागायेंगेना” म्हणत आव्हान तस्कराचे आहे. वर्धा नदी परिसर व पैनगंगा परीसरात रोज दिवसा ढवळ्या रेती खुलेआम तस्करी होत आहे. शासनाच्या जागेतून लाखो रुपयांचा खनिजे चोरून सुद्धा वणी महसुल प्रशासन त्यावर कार्यवाही फक्त “गाडी पकडो दंड भरो फिर से दुसरे गाडी से काम करो “ परंतू त्या चोरट्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करायला तयार नाही. स्पष्ट झोला प्रकरणात दिसून आले.आता जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून त्या चोरट्यांकडून दंड वसुली करणे हाच एक पर्याय उरला नाहीं तर त्यांवर व संबधित शिवारातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचावर गुन्हा दाखल करावं असं जनसामन्यातून मागणी होत आहे.